Wednesday, July 1, 2009

कथा...


ही कविता नाही ,कथा आहे ,
एका फाटक्या नशिबाची .
हयात लिहिलेले शब्द नाहित ,
व्यथा आहे एका फकिराची .

प्रत्येक शब्दात स्वतःचे मन उतरवले ,
यमक जुळत नसतानाही , तुटके मन जुळवले .
शब्द , लिहायचा त्याना परत मिटवायचा ,
जमले असे वाटताच , डोळ्यातले अश्रु विसरायचा .

पण ओळी त्याच्या पूर्णत्वाला कधी पोहचल्याच नाहित जिच्यासाठी लिहिले ,
तिने वाचले , पण मनापर्यंत तिच्या कधी पोहचालेच नाही .

तो तिची मनातली छबी शब्दात उतरवायचा ,
तर कधी तिला देव मानून , कवितेत पूजायचा .

त्या देवीला ही त्याची पूजा कधी कळलिच नाही ,
या शापित भक्तावर ती देवी कधी प्रसन्न झालीच नाही .

लोकाना मात्र त्याच्या कवितांचे नवल वाटायचे ,
काहीजण त्यांवर खुष होउन ,तर काही मिश्किल पने हसायचे .

त्यांवर कधीच लक्ष दिले नाही .
कारण त्याला तिच्या पलिकडे काही सुचलेच नाही .

पण तीही त्याच्यावर हसली ,त्याचे मन तुटले ,
त्याने देवाला विचारले ," एवढी परीक्षा कसली ?"

तरी तो ते तुटके मन परत जोडायचा ,
म्हणे , ती रहाते या मनात ,म्हणुन परत शब्दाना तोडून - मोडायचा .

पण आता त्याचाही धीर तुटत होता ,
डोळ्यांवर लावलेला बाँध सतत तुटत होता .

कदाचित ही तरी त्याची ती शेवटची शापित कविता असेल ,
पण तो तिची वाट पहाणे सोडणार नाही ,
हा त्या शापित कवीचा शेवट नसेल .

No comments:

Post a Comment