Wednesday, August 26, 2009

पुन्हा कोण ?

आज या मंद पहाटे,

नभ का धरणीवर कोसळतो?

मनाच्या अंधारलेल्या कोनाड्यात,

कोणत्या आठावणिचा धुंद प्रकाश मिसळवितो ?

जपले होते जे,

मनात विरघळलेले गुज लपविलेले,

डोळ्यात थाम्बविले बंद पापण्यात बांधिलेले,

दिस उगताच का ते हितगुज स्वतहालाच आज सांगितलेले?

अशी का ती हाक होती?

स्वतहालाच,किव्हा कोण्या दुसरयाला होती?

गगनी कोसळून,परत माझ्यातच विरलेली,

या अनंतातही का जागा टोकडिच पडली?

होते नभ ही पाणावलेले,

होते मनही दुरावालेले,

होते आपलेच कोणी उगी रागावलेले...

उसने मन माझेच मज पाशी,कोणत्याच कर्जात जणू पार व्याजावलेले...

स्पर्शात कोण्या आठवणीच्या,

आजही ओलावा जाणवितो,

मनात आहेत...आहेत ना ज्या भावना,

त्याना आपलाच मानवितो....

आज या मंद पहाटे,

नभ का धरणीवर कोसळतो?

मनाच्या अंधारलेल्या कोनाड्यात,

कोणत्या आठावणिचा धुंद प्रकाश मिसळवितो ?

Tuesday, August 25, 2009

पलिकडे...

त्या तिथे पलिकडे,
काहीतरी परिचित असे घडत आहे,
का कोणास ठाउक,
रोज़ कोणीतरी रडत आहे...

हे हुंदके तर अगदीच परिचयाचे वाटतात,
जणू हे तर माझ्यात आत कोठे तरी रहातात,

कोणाशी तरी बोलत आहे मन,
सवय झाली आहे एकान्याची "पण"......

रात्री चुप-चाप निमूटपणे पडला असतो,
आणि दिवसा हा तर कोणाचाच नसतो,

कदाचित माझे मनच असेल,
मनाचे काय आकसून बसेल,
बघणारयाला मात्र तुटलेले असुनही...
जुड़लेलच दिसेल.....

त्या तिथे पलिकडे हुंदके देणारे ,
मन कदाचित माझच असेल....
माझ्याशीच अनोळखी होउन,
परक्या सारखे वागेल.....

Sunday, August 23, 2009

तू नाहीस....

तू नाहीस,

अगदी क्षणापूर्वी पर्यंत होतीस,

पण असे काय झाले?

की तू होतिची नव्हती झालीस....


तू नाहीस,

हे विचारायचे होते तूला की,

तुझ्या शिवाय ह्या जगण्याला काय अर्थ?

पण कळलेच नाही की एवढ्यात तू मला विसरलीस...


तू नाहीस,

सवय झाली होती तुझ्या असण्याची,

कळलेच नाही मला की,

मला तुझ्या असण्याची सवय जडवलिस...


तू नाहीस,

हे मला समजतच नाही,

अता माझे अस्तित्व काय?

या जगण्यात अता तथ्य काय?

तू नाहीस,

पण तू आहेस,

मनात आठवणी म्हणुन,

रात्रीत चांदण बनून, श्वासात सवय बनून,

शब्दात अर्थ बनून....आणि नसन्यातहि....असने बनून,

तू राहिलिस,तू आहेस....

अताशा...

अताशा मी उरलोच नाहीये,

का कोणास ठाउक श्वास तर चालु आहे,

पण जगने-मरने यातील अंतर उरलेच नाहिये...


मी अताशा स्वतःलाच सापडत नाहिये,

मित्रांच्या गर्दित कोंडले तर आहे,

पण कोण जाने कोणती ओळखिची नजर सापडतच नाहिये...


अताशा डोळे सुखतच नाहिये,

भर पावसात उभा ठाकलो तर आहे,

पण आसव पावसात लपतच नाहिये....


अताशा रात्र संपतच नाहिये,

डोळे तर मी घट्ट बंद केले आहे,

पण मरणापरी सकाळ उगवतच नाहिये...


अताशा काहीच कसे आठवत नाहिये?

तसे मनाची सर्व कवाड बंद केलीत मी,

पण एक तुझीच आठवण आहे,

की जी आत खोलवर मनात विसरायची राहून गेलिये....

फ़ोन

आज तुला फ़ोन करावासा वाटत आहे...

का जाणे पण मला तुझा आवाज एकावासा वाटतो...


हातात फ़ोन घेतलाय खरा...

पण काय बोलू तुझ्याशी असा प्रश्न मनात दाटतो.....


तुझ्या-माझ्यात तसे विषयांचे बंधन कधीच नव्हते...

पण नंबर तुझा लावता-लावता सारखा राहतो.....


फ़ोन हातात घेउन कधी पासून फिरतोय,

नेटवर्क तर फुल आहे पण का जाणे का झुरतो....


माहीत आहे वर-वर का नाही,पण तू माझ्याशी बोलशील,

पण बोलली नाहीस तर ह्या विचाराने मन माझा थर-थरातो...


रोज़ म्हणतो आज तरी निदान तू फ़ोन करशील,

वाट बघून थकल्यावर मीच बोलतो चला मीच फ़ोन करतो....


आपण मारलेल्या फ़ोन वरील तासनतास....

गप्पा....आठवून....मग....त्या आठवणी मध्ये रमतो....


पण खरच आज तुला फ़ोन करावासा वाटतो...

Friday, August 7, 2009

"दीप"

आज देवाने आगाळीक साक्षात्कार घडवले,
स्वतःच्या प्रतिमेत त्याने मला तुझे रूप दर्शाविले...

देवास केले मी तेव्हा शत प्रणाम,
जणू त्याने दिले माझ्या सत्य प्रेमाची प्रमाण..

देवाचे रूप वाटत होते तेव्हा नयनरम्य,
कारण पाहत होतो मी तुमच्यातले साम्य...

तेव्हा अचानक देवातून तू नाहीशी होऊ लागली,
माझ्या काळजाचा ठोका चु़कला,
कारण देवाच्या नजरेत मला कसलीतरी काळजी दिसू लागली...

देवाची काळजी मला समजत होती,
देवाला वाटत असावी,माझे मन तुटन्याची भीती...

तेव्हा मी देवाला समजावले,माझी काळजी नको रे बाबा,
नाहीतरी आता राहिला कुठे माझ्या मनावर माझाच ताबा...

मन हे माझे सोपविले जिला मी,तिलाही हे आहे ठाउक,
पाघळेल कधीतरी तिचे मनही तशी तीही आहेचकी भाउक...

मी माझे माझे काम करत राहेनच,तेच तर आहे माझ्या हातात,
तिच्यावर प्रेम करणे,तुझी प्रार्थना करणे यातच आहे माझे कृतार्थ...

देव तेव्हा मला बोलला,तिचे काही माहीत नाही,
मी तुझ्यावर प्रसन्न आहे...

देव तेव्हा मला बोलला,तिचे काही माहीत नाही,
मी तुझ्यावर प्रसन्न आहे...

मी त्याला बोललो ठीक आहे,
पण मला याचीच तर खंत आहे...

देव मला म्हणाला तिचा निर्णय ती घेइल,
माझ्या कडून तुला काय हवे आहे,
मी त्याला बोललो ,
जर का ती माझी झाली तर मला तुझिही गरज नाही,
आणि ती जर माझी होणार नसेल ,
तर तुझ्यात तरी तिचे रूप दिसेल असेल कर....

तेव्हा देवाने तथास्तु बोलले,
आणि प्रत्येक देवा समोर तुला "दीप" बनवून तेवत ठेवले...