Friday, August 27, 2010

तू आणिक तुझी आठवण...

तू पाऊस झर-झर...
तुझी आठवण...ओलावा...मनी असतो हर क्षण...

तू सोसाट्याचा वारा..
तुझी आठवण...सुगंधी ...मंद हवेची झुळूक....

तू उफाणलेला सागर...
तुझी आठवण....नौकेला....धीर देणारा...किनारा..

तू उन-सावल्यांचा लपंडाव...
तुझी आठवण...विरहाच्या उनात...हवा-हवासा वाटणारा..निवारा...


तू कधी असतेस...तर कधी नसते...
तुझी आठवण...तुझ्या माघारी मला जपते....

Saturday, August 21, 2010

अनोळखी...

शोधायचे नाही स्वतहाला.. मी आता ठरवले आहे,
खडका सम मन ....आज पुन्हा गोंजारले आहे....
आजही थोडा ओलावा जाणवतो मनात...
ठाऊक नाही...कोणा जन्माचे अश्रू मनी सांभाळले आहे...

सांगायचे नाही कोणा...न द्यावयाचे...
आपले दुख असेच मनी... जपायचे...
ओळखले जरी कोणी...तरी न आपण त्यासी ओळखायचे...
असेच हरवून स्वताहापासून...अनोळखी म्हणवायचे आहे...

Sunday, August 8, 2010

नवी-नवी मैत्री आपुली

नवी-नवी मैत्री आपुली,
नव्या आपल्या भावना...

रोजचाच चंद्र नभी तो,
वाटे आज मज का आज नवा,
ओढ लागली चंद्रालाही माझी आज...मलाही वाटे तो हवा-हवा..
नवी-नवी मैत्री आपुली,
नव्या आपल्या भावना...

वेग-वेगळ्या प्रवासाचे प्रवाशी आपण,
वाटा जुन्या जरी,भेट आपुली नव्या वळणावर,
सवे सोबती तुझ्या....रस्ता जुनाही वाटे आज का नवा-नवा,
नवी-नवी मैत्री आपुली,
नव्या आपल्या भावना...

भेट जरी नवी आपुली,
ओळख न जाणे कोण जन्मांची,
अंतर आपल्यातली विस्कटू लागली...ओढ लावे आता जीवा....
नवी-नवी मैत्री आपुली,
नव्या आपल्या भावना...

अजाण,हळवे,नाते आपले..
अवचित जुळावे कैसे कोण ठाव,
मैत्रीचे सुंदर आपुले नाव नसलेले एकच गाव,
त्यात दोघेच आपण आणि रोज पाहु एक दिवस नवा...
नवी-नवी मैत्री आपुली,
नव्या आपल्या भावना...

Friday, August 6, 2010

विसरायचे आहे ..

मला विसरायचे आहे ,

मला विसरायचे आहे कि “माझे तुझ्यावर प्रेम आहे”,

असे मी तुला बोललो होतो,

आणि हेही विसरायचे आहे कि ,

त्याचे उत्तर तू नकारात दिले होते.…

मला विसरायचे आहे ..



मला विसरायचे आहे ..

कि तुझ्या नकारा नंतरहि आपल्यात काहीच बदलले नाही,

किंबहूना आपण आणखीनच जवळ आलो ,

मला विसरायचे आहे कि तू मला आणि मी तुला समजायला लागलो ,

मला आज काहीच समजून घ्यायचे नाही,

मला फक्त विसरायचे आहे....



मला विसरायचे आहे,

तो वेळ जेव्हा एक-मेकांशी बोलताना आपण वेळांचे भान हरपायचो,

मला विसरायचे आहे त्या वाटा ज्यांवर आपण एकत्र चाललो होतो,

मला हेही विसरायचे आहे कि ,

नंतर मी एकटाच कित्येक वेळ त्या वाटानवर तुझ्या पाउलखुणा पहात होतो,

मला विसरायचे आहे...



मला विसरायच्या आहेत त्या भेटी ,

जेव्हा समोरा- समोर असून आपल्या नजरा मिळाल्या नाहीत ,

आणि जेव्हा मिळाल्या तेव्हा आपल्याला काही बोलावे लागले नाही..

मला विसरायचे आहे...



मला विसरायचे आहे कि माझ्याकडे तुझ्या काही तसविरी आहेत,

आणि हेही कि त्या तसविरी मी कोठे जपून ठेवल्यात ते,

आणि हेही विसरायचे आहे कि...त्याना मी तासं-तास न्याहाळायचो.........(आणि आजही त्यांच्याशी मी हितगुज साधतो)

मला विसरायचे आहे...



मला विसरायचे आहे कि...मी तुला विसरू शकत नाही...

सांग हे शक्य होईल का?

मी तुला विसरेन का...?

मला विसरायचे आहे...

आठवण...

विसरवून स्वतःला का न माझी होशी?
आज येते म्हणतेस,
मन वाट पाहिलं,
आठवण बनून तोवर मनी माझ्या रहाशी...

Wednesday, August 4, 2010

माझी तू ...३

शब्दानाही बंधन आहेत,
कविता तरी मज कैसे सुचावे...
सांग सवे मज...
रुपाला मी तुझिया कैसे वर्णावे.....


बागा सुन्या तुझविन
पाहून तुझ फुलानाही वाटे रुसावे...
गालावर खळी पाहून तुझिया
वाटे तू सदा असेच हसावे....


उसने सौंदर्य त्या चंद्राचे
उपमा त्याची तुजला कैसे द्यावे...
दिवसा निघता तू ,
न राहावूनी सुर्यानेही तुझ लपून पाहावे....
सांग सवे मज...
रुपाला मी तुझिया कैसे वर्णावे.....

Friday, April 2, 2010

विरहाचा उन्हाळा.

विरहाचा उन्हाळा.
उन्हाने आता डोळ्यातील आसव देखील सुखु लागली आहेत,आणि बहुतेक मनात देखील कोरड पडू लागली आहे.
हा उन्हाळा त्या विरहाच्या ज्वालाग्नी पेक्षा तरीही बरा, कारण उन्हात चालताना पायात रेंगाळणारी सावली कोणाची तरी आठवण करून देते.
तेव्हा आलेली ती आठवण जणू भर उन्हात झाडांच्या थंड सावलीत चालल्या सारखे भासवते.आणि एखादी आठवण तर नदीवरून सोबत ओलावा घेऊन आलेल्या थंड हवेच्या झुळूकासम असते.
दिवसा उन्हाने अंगाची काहिली होते,तर सांज होता-होता सूर्य मावळनिला लागतो,आणि देऊन जातो आठवणींचा उन्हाळा, ह्या आठवणीच्या उन्हात मात्र कशी थुक नाही पण कोठे तरी पाझर फुटतो,घाम नाही येत,पण कोरडे पडत चाललेले डोळे पाझरतात,हात डोळे पुसाया साठी सरसावतात ,पण हाताला पुन्हा कोरडच नशिबी येते,कोरड "विरहाची".
उन्हाळ्यात जशी जमीन सुकून पार भेगा पडतात,तसेच आता मनाला भेगा पडायची वेळ आली आहे आताशा.
धरणीला जशी पावसाची आशा लागली असते,तशीच काहीशी आशा मनाला आपुलकीची,प्रेमाची लागली असते...
पण हा तर चकव्याचा रस्ता पुन्हा एका कोरड्या वाटेत सोडून देतो,कारण पाउस पडला तरी उन्हाळा पण परत येतोच,....विरह पुन्हा येतोच....सोबत पावसाची,आपुलकीची,प्रेमाची आठवण घेऊन येतो...