Thursday, September 3, 2009

अर्था पेक्षा माझे शब्दच होते वेडे,
तू एकलेस सर्व,
तरी मनी अजुनही लपवले थोड़े,

सांगेन म्हणतो तुला सर्व काही,
बघ संपत आलाय पाउसकाळ,
डोळेही थकलेत लपवून,
आता आलीये त्यांचीही बरसन्याची वेळ...

लक्ष दे माझ्या बोलान्यापेक्षा,डोळ्यानकड़े,
राहुंदे नको डोळे,
लपत-लपत,
सतत-धार वाहुंदे...

नाही जगने तुझ्याशिवाय,
एवढेच बोलायाचे होते,
तुझ शिवाय मरणार नाही,
जगेन हे मरानोपरी आयुष्य,असेच जगल्याशिवाय....

No comments:

Post a Comment